ask a question

वृत्तपत्रांचे महत्व


वृत्तपत्रांचे महत्व

मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात रोज नवनवीन घटना घडतात त्या मानवी जीवनाला प्रभावित करतात. छोट्या छोट्या घटना जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. जसजसा आपला बौद्धिक स्तर उंचावत जातो तसतसे आपण जगभरातील घटनांची माहिती मिळवू इच्छितो, या आपल्या जिज्ञासेची तृप्ती वृत्तपत्र करते. भारतात वृत्तपत्राच्या विकासाचा श्रीगणेशा १७८० मधील 'बंगाल गॅजेट' पासून मनाला जातो. त्यानंतर हिंदीतील पहिले वृत्तपत्र, 'उदंड मार्तंड' संपादक श्री जुगलकिशोर यांनी काढले, भारतात वृत्तपत्राचा विकास स्वतंत्रता चळवळीपासून सुरु झाला. अनेक राष्ट्रीय पुढाऱ्यांनी वृत्तपत्र काढले, त्यामुळे त्यांचा जनतेशी संपर्क प्रस्तापित झाला. राजा राम मोहन रॉय यांनी पहिले उर्दू वृत्तपत्र 'मिराईतुलम' काढले. टिळकांचे 'केसरी' व 'मराठा', महात्मा गांधींचे 'हरिजन' आणि 'यंग इंडिया' ही हिंदी, इंग्रजी, उर्दू, मराठी वृत्तपत्रे प्रकाशित झाली. हळूहळू त्यांचा प्रसार - प्रचार वाढला. आज आपल्या देशात असंख्य वृत्तपत्रे दररोज प्रकाशित होतात.

वृत्तपत्रे फक्त दैनिकच असतात अस नव्हे, तर पाक्षिक, मासिक, साप्ताहिक, वार्षिक, अर्धवार्षिक पण असतात. प्रमुख वृत्तपत्रे प्रातःकालीन असतात तर काही सायंकालीन पण असतात. सर्वात जास्त प्रातःकालीन दैनिकच लोकप्रिय आहेत, कारण त्यातून देश - विदेशांतील मुख्य माहिती मिळते.

व्यावसायिकतेच्या ऊद्देशाने पत्रकारिता सुरु झालेली नव्हती तर पाश्चीमात्य शिक्षणातुन आधुनिकतेची झालेली ओळख समाजाला करुन देण्याचे ध्येय त्यामागे होते.  म्हणुनच वृत्तपत्राचे हे माध्यम समाजासाठी दिशादर्शक ठरते. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात गतीने इतरही प्रसार माध्यमे आलीत. मात्र, वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवून आजही दीपस्तंभासारखे दिमाखाने उभे आहे. आज शहरच नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत वृत्तपत्राचे जाळे पसरले आहे . शाळा-महाविद्यालयांतुन युवक युवतींचा वाचक वर्ग तयार झाला आहे.

हे जाहिरातयुग आहे. मोठमोठ्या कंपन्या वृत्तपत्रांतून आपल्या मालाची जाहिरात करतात. त्या जाहिराती लोक वाचतात त्यामुळे लोकांना अनेक वस्तूंची माहिती होते, व्यापार वाढतो तसेच वृत्तपत्रांना आर्थिक लाभ पण होतो. वृत्तपत्रांमुळे आपल्याला जगाची माहिती घरबसल्या मिळते. नौकरी विषयक बातम्या, विवाह मंडळांची माहिती, घरांची माहिती, बाजारभाव, स्थानिक घडामोडी, शैक्षणिक संस्था, वेगवेगळे अभ्यासक्रम या सर्वांबद्दल माहिती मिळते. लोक वेगवेगळ्या कारणांनी वृत्तपत्रे वाचतात. कोणाला सिने जगतातील माहिती हवी असते तर कोणाला खेळांविषयी.

लोकशाही असणाऱ्या देशात वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची आहे. समाजातील वाईट चालीरीती दूर करण्यात वृत्तपत्रे मागे नाहीत. प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट, दिवाळी, होळी, इत्यादीं वर वृत्तपत्रे विशेषांक प्रकाशित करतात. यातील लेख महत्वपूर्ण असतात. वृत्तपत्रे केवळ नवीन माहीतीच आपणास पुरवतात असे नसून विचारांची देवाण - घेवाण पण करतात. निवडणूक काळात निरनिराळ्या नेत्यांच्या घोषणा ते आपणापर्यंत पोहोचवतात.

वृत्तपत्रांचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. लोकमत जाणून घेण्यासाठी तसेच जगजागरणासाठी वृत्तपत्रांचा उपयोग करता येतो. सामाजिक ऐक्य व परस्पर सहकार्य वाढविण्यात वृत्तपत्रे मदत करू शकतात. हुंडा, अस्पृश्यता, जातीभेद दूर करण्याची कामगिरी पार पडू शकतात. टीव्ही, कॉम्प्युटरच्या युगातही वृत्तपत्रांचे महत्व अभाधित आहे. वृत्तपत्रांनी ही आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन बातम्या दिल्या पाहिजेत, फक्त प्रसिद्धीच्या मागे लागू नये.

वैश्विक माहिती समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोचविण्यचे काम वर्तमानपत्रांतून होते. त्यामुळे समाज प्रगतीत, देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा आहे. समस्त जनांचा, गोरगरिबांचा, महिलावर्गांचा, दिनदुबळ्यांचा कैवारी म्हणून वर्तमानपत्राची जबाबदारी आहे. आणि ती आज निःस्वार्थपणे पार पाडली जात आहे. 
time: 0.0136971474